Monday, September 14, 2026
Lokprawah
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Lokprawah
No Result
View All Result

भारत जोडो यात्रा देशाची एकता व एकात्मता टिकविण्यासाठी – अरुणभाई गुजराथी ; चोपडा येथे भारत जोडो पदयात्रा संदर्भात काँग्रेस सह समविचारी पक्षांची बैठक ..!

टीम लोकप्रवाह by टीम लोकप्रवाह
November 11, 2022
in राजकीय
0
भारत जोडो यात्रा देशाची एकता व एकात्मता टिकविण्यासाठी – अरुणभाई गुजराथी ;  चोपडा येथे भारत जोडो पदयात्रा संदर्भात काँग्रेस सह समविचारी पक्षांची बैठक ..!
लोकप्रवाह, चोपडा दि. ११ – सन १९४२ मध्ये जी क्रांती झाली त्यावेळी भारत छोडो तशी आता भारत जोडो यात्रा आहे. देशाची एकता एकात्मता टिकली नाही तर भारत शून्य होईल. भारत जोडो यात्रा देशाची एकता एकात्मता राहण्यासाठी आहे असे प्रतिपादन माजी विधानसभाध्यक्ष अरुणभाई गुजराथी यांनी केले.
चोपडा येथे भारत जोडो पदयात्रा नियोजन संदर्भात काँग्रेस ,राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना (ठाकरे गट) व इतर समविचारी पक्षांची बैठक आयोजित केली होती त्यावेळी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर आमदार शिरीष चौधरी, माजी आमदार कैलास पाटील, भारत जोडो यात्रा जिल्हा समन्वयक तथा माजी जिल्हाध्यक्ष अॕड. संदिप पाटील, काँग्रेस जिल्हाध्यक्ष प्रदीप पवार, चोसाका माजी अध्यक्ष अॕड. घनश्याम पाटील, जिल्हा बँकेच्या माजी उपाध्यक्ष इंदिराताई पाटील, चोसाका अध्यक्ष अतुल ठाकरे, जिल्हा बँक संचालक डॉ. सुरेश पाटील, अनिल पाटील, नगरसेवक किशोर चौधरी, माजी तालुकाध्यक्ष सुरेश पाटील, अजबराब पाटील, जमील शेख, ज्ञानेश्वर कोळी, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष राजेंद्र पाटील, रमेश सोनवणे, प्रकाश रजाळे, नौमान काझी, फातिमा पठाण, धिरज गुजराथी, हरीश पवार, के.डी.चौधरी, तालुकाध्यक्ष प्रदीप पाटील आदी होते.
अरुणभाई गुजराथी पुढे म्हणाले की, ही यात्रा परिवर्तनाची यात्रा आहे. मागील आठ वर्षात काय झाले? आताच्या राजकारणात मी राजकारणी आहे असं सांगायला सुद्धा लाज वाटते. गलिच्छ राजकारण झाले आहे. राजकारणात विश्वासार्हता गमावली जात आहे.
देशाला काँग्रेसशिवाय पर्याय नाही. स्वातंत्र्य मिळवितांना जो सत्याग्रह केला होता. त्याची आठवण या पदयात्रा मधून येत आहे. यामुळे भारतात चैतन्य निर्माण झाले आहे. मतभेद विसरा, तरूणांना संधी द्या. तरुण गमावलेला आहे, संघटना गमावली आहे हे जागृत करण्याचे काम राहुल गांधी करीत आहे. “ब्र”शब्द काढला तरी जेलमध्ये टाकल्याशिवाय राहणार नाही. आज देशाची अर्थव्यवस्था कुठे जात आहे? सर्व प्रकल्प विकून टाकले जात आहेत. देशाला ग्रहण लागले आहे. राहुल गांधी यांना साथ देऊन पदयात्रा मध्ये सामील व्हावे. असे चोसाका माजी अध्यक्ष अॕड. घनश्याम पाटील यांनी सांगितले.
 देशाचे भवितव्य मजबूतीसाठी हि यात्रा काढण्यात आली आहे. सामान्य माणसाचा विश्वास निर्माण करण्यासाठी ही यात्रा आहे. हे काम राहुल गांधी समविचारी पक्षांना घेऊन करीत आहेत. देशाचे भवितव्य मजबूत  करण्यासाठी ही यात्रा आहे. यावरच  देशाचे भवितव्य ठरवणार. या यात्रेत गोरगरिब व आदिवासी बांधव सामील झाले असल्याचे प्रतिपादन आमदार शिरीष चौधरी यांनी केले.
२०१५ साली नरेंद्र मोदी यांनी काळा पैसा परत येईल,१५ लाख खात्यामध्ये जमा होतील असे खोटे आश्वासन जनतेला दिले. सामान्य माणूस उघड्या डोळ्यांनी सर्व पाहत आहे. ज्यांच्यासाठी भांडत आहोत तेही हात बांधून आपल्याकडे पाहतात ते विदारक चित्र संपूर्ण देशात निर्माण झाले आहे. विरोध करायला कोणी तयार नाही. बोलला की ईडी आणि सीडी लावली जाते. जाती- जातीत, धर्मा-धर्मात तेढ निर्माण करून, जातीय राजकारण करून हा देश खिळखिळा करण्याचा प्रयत्न सुरू आहे. म्हणून राहुल गांधी रस्त्यावर उतरले आहेत. जळगांव जिल्ह्यातून २०० एसटी बसेस रवाना होणार असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष प्रदीप पवार यांनी दिली.
यावेळी अॕड. संदीप पाटील यांनीही मनोगत व्यक्त केले. यावेळी शेतकरी कृती समितीचे एस बी पाटील, चोसाका उपाध्यक्ष शशिकांत देवरे, मधुकर पाटील, अॕड. एस डी पाटील आदींसह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.
Post Views: 540
Previous Post

चोपडा रोटरी तर्फे अडावद येथे विधवा महिलांना निर्धूर चुलींचे मोफत वाटप 

Next Post

चहार्डी येथील शेतकऱ्याची दिड लाखात फसवणुक; शहर पोलीस स्टेशनला दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

Next Post
चोपडा शहर पोलीसांची धडक कारवाई, 6 गावठी बनावटीचे पिस्टल व 30 जिवंत काडतुसांसह जवळपास ४० लाखांचा मुद्देमाल जप्त..!!

चहार्डी येथील शेतकऱ्याची दिड लाखात फसवणुक; शहर पोलीस स्टेशनला दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

चोपडा शहरासह तालुक्यात पावसाचे पुनरागमन; शेतकऱ्यांमध्ये समाधान

चोपडा शहरासह तालुक्यात पावसाचे पुनरागमन; शेतकऱ्यांमध्ये समाधान

by टीम लोकप्रवाह
September 12, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा, दि. 12 : चोपडा शहरासह तालुक्यातील काही ग्रामीण भागात शुक्रवारी रात्री पावसाने दमदार हजेरी लावल्याने नागरिकांसह शेतकरी...

उमेदच्या कॅडर्सचे रखडलेले मानधन अखेर खात्यावर जमा

उमेदच्या कॅडर्सचे रखडलेले मानधन अखेर खात्यावर जमा

by टीम लोकप्रवाह
September 9, 2026
0

टिम लोकप्रवाह, वर्धा दि. 09 : महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अर्थात ‘उमेद’ अंतर्गत कार्यरत कॅडर्सचे गेल्या काही महिन्यांपासून रखडलेले...

शिवबा स्पोर्ट्स अकॅडमीने ५ थर रचत फोडली दहीहंडी!

शिवबा स्पोर्ट्स अकॅडमीने ५ थर रचत फोडली दहीहंडी!

by टीम लोकप्रवाह
September 6, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि.६: चोपडा शहरात दरवर्षीप्रमाणे यंदाही दहीहंडी उत्सवाचा उत्साह आणि जल्लोष पाहायला मिळाला. रोहितदादा निकम फाउंडेशन, जळगाव यांच्या...

कमलेश पाटील यांची भाजपा शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

कमलेश पाटील यांची भाजपा शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

by टीम लोकप्रवाह
September 6, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि. 06 : भारतीय जनता पार्टी जळगाव जिल्हा (पूर्व) शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी कमलेश पाटील यांची निवड...

गणेशोत्सवासाठी परवानगी बंधनकारक; विनापरवानगी मंडळांवर कारवाई

गणेशोत्सवासाठी परवानगी बंधनकारक; विनापरवानगी मंडळांवर कारवाई

by टीम लोकप्रवाह
September 4, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि . 04 - आगामी श्री गणेशोत्सव २०२६ शांततेत, सुरक्षिततेत आणि शिस्तीत पार पडावा, यासाठी चोपडा शहर...

अशोक सोनवणे यांच्या ‘परिस्थितीच्या दुसेरीखाली’ काव्यसंग्रहाला राज्यस्तरीय पुरस्कार

अशोक सोनवणे यांच्या ‘परिस्थितीच्या दुसेरीखाली’ काव्यसंग्रहाला राज्यस्तरीय पुरस्कार

by टीम लोकप्रवाह
September 3, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा, दि. ३ : कविता, कवितेचा आशय-विषय, कवीची लेखनशैली, अनुभवांची व्यामिश्रता, अभिव्यक्तीचे वेगळेपण, सद्यस्थितीशी कवितेचे असलेले नाते तसेच...

चोपडा समाजकार्य महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांकडून उपजिल्हा रुग्णालयातील रुग्णांना फळवाटप

चोपडा समाजकार्य महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांकडून उपजिल्हा रुग्णालयातील रुग्णांना फळवाटप

by टीम लोकप्रवाह
September 3, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा, दि. : भगिनी मंडळ, चोपडा संचलित समाजकार्य महाविद्यालय, चोपडा आणि आदिवासी महासंघ, महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने...

वर्धा धान्य गैरव्यवहाराची एसआयटी चौकशी करा; आपचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत दोड यांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन

वर्धा धान्य गैरव्यवहाराची एसआयटी चौकशी करा; आपचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत दोड यांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन

by टीम लोकप्रवाह
September 3, 2026
0

टिम लोकप्रवाह, वर्धा दि. 03 : तहसील कार्यालयातील धान्य पुरवठा विभागात शासकीय रेशन धान्याच्या वितरणात लाखो रुपयांचा कथित गैरव्यवहार झाल्याप्रकरणी...

डॉ. चंद्रकांत बारेला यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – शरदचंद्र पवार यांच्या महाराष्ट्र प्रदेश प्रवक्तेपदी नियुक्ती

डॉ. चंद्रकांत बारेला यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – शरदचंद्र पवार यांच्या महाराष्ट्र प्रदेश प्रवक्तेपदी नियुक्ती

by टीम लोकप्रवाह
August 30, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा | ३० ऑगस्ट - राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – शरदचंद्र पवार यांच्या महाराष्ट्र प्रदेश प्रवक्तेपदी डॉ. चंद्रकांत बारेला...

खेळातून समाजसेवेचा संदेश; जयहिंद क्रिकेट क्लबकडून गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप

खेळातून समाजसेवेचा संदेश; जयहिंद क्रिकेट क्लबकडून गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप

by टीम लोकप्रवाह
August 30, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा : जयहिंद क्रिकेट क्लब, चोपडा (चोपडा नवचेतना बहुउद्देशीय संस्था संचलित) यांच्या वतीने सामाजिक बांधिलकी जपत विविध समाजोपयोगी...

Load More
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!

WhatsApp us