Tuesday, August 4, 2026
Lokprawah
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Lokprawah
No Result
View All Result

पर्यावरणाच्या रक्षणासाठी सामुहिक प्रयत्नांची गरज – राकेश शेपट, उपवनसंरक्षक

टीम लोकप्रवाह by टीम लोकप्रवाह
June 5, 2023
in महाराष्ट्र, वर्धा जिल्हा, विदर्भ, सामाजिक
0
पर्यावरणाच्या रक्षणासाठी सामुहिक प्रयत्नांची गरज – राकेश शेपट, उपवनसंरक्षक
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

टिम लोकप्रवाह, वर्धा, दि. 5 – पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी प्रत्येक नागरीकांनी किमान एक झाड लावून ते जगविणे आवश्यक आहे. जास्तीत जास्त जनजागृती निर्माण करून पर्यावरण रक्षणासाठी सामुहिक प्रयत्न करण्याची गरज आहे, असे प्रतिपादन वर्धाचे उपवनसंरक्षक राकेश शेपट यांनी केले.

मार्गदर्शन करतांना उपवनसंरक्षक राकेश शेपट

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त माहिती व प्रसारण मंत्रालय, भारत सरकारच्या केंद्रीय संचार ब्यूरो, क्षेत्रीय कार्यालय, वर्धा तर्फे महात्मा गांधी ग्रामीण औद्योगिकरण संस्था (एमगिरी), सुष्म, लघु एवं मध्यम उद्यम मंत्रालय, भारत सरकार आणि जैव प्रसंस्करण एवंम जडीबुटी विभाग (एमगिरी) यांच्या सहकार्याने मगनवाडी परिसरातील राजकला टॉकीज रोड येथील महात्मा गांधी ग्रामीण औद्योगिकरण संस्था (एमगिरी) येथील सभागृहात जागतिक पर्यावरण दिन विशेष प्रचार प्रसार अभियान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. मंचावर रामनगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक महेश चव्हाण, महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विश्वविद्यालयाचे जनसंपर्क अधिकारी बुध्ददास मिरगे, एमगिरीचे उपनिदेशक तपस रंजन, केंद्रीय संचार ब्यूरो, क्षेत्रीय कार्यालय, वर्धाचे क्षेत्रीय प्रचार अधिकारी हंसराज राऊत उपस्थित होते.

उपस्थित नागरिक

श्री. शेपट पुढे म्हणाले की, पर्यावरण समतोल राखण्यासाठी प्रत्येक व्यक्तीने लहान-लहान गोष्टींकडे लक्ष केंद्रीत करून कुठेही कचरा निर्माण होणार नाही, याची काळजी घ्यावी. भारतातील स्वच्छ शहरांच्या यादीत वर्धेचा कसा समावेश होईल, याकरीता सर्व नागरीकांनी स्वच्छ वर्धेचा संकल्प करण्याची गरज आहे. तसेच प्रत्येक व्यक्तीने किमान एक झाड जगवून पर्यावरणाच्या रक्षणाची जबाबदारी घेणे आवश्यक आहे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. श्री. महेश चव्हाण म्हणाले की, घरातील कचरा हा प्लास्टीक पिशवीत टाकणे टाळायला हवे. ओला कचरा तथा सुका करचा याची विभागणी करावी. दररोजच्या वापरात प्लास्टीकचा वापर कमी करण्यावर भर द्यावा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. श्री. मिरगे म्हणाले, सर्वाधिक पर्यावरणाची हानी प्लास्टीकमुळे होत आहे. त्यामुळे आपण नकळतपणे निसर्गाच्या समतोल ढासळण्यास जबाबदार ठरत आहोत. त्याकरीता प्रत्येक नागरीकांनी प्लास्टीक मुक्तीचा संकल्प करून त्या दिशेने पाऊल उचलणे गरजेचे असल्याचे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.

पुरस्कारार्थी विद्यार्थ्यांसह मान्यवर

यावेळी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते चित्रकला व रांगोळी स्पर्धेतील विजेत्यांचा बक्षीस व प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला. चित्रकला व रांगोळी स्पर्धेचे परीक्षक म्हणून एमगिरीचे व्ही. राव, टी. राजन यांनी काम पाहिले. बक्षिस विजेत्यांची यादी खालीलप्रमाणे

चित्रकला स्पर्धा

1) श्रेया कांबळे, प्रथम बक्षीस
2) पायल काठले, द्वितीय बक्षीस
3) किरण मोहिते, तृतीय बक्षीस

रांगोळी स्पर्धा
1) पायल चाफले प्रथम बक्षीस
2) कोमल देठे, द्वितीय बक्षीस
3) श्यामली जामणे, तृतीय बक्षीस

यावेळी एमगिरीच्या जैव संस्करण विभागाचे उपनिदेशक डॉ. आदर्शकुमार अग्निहोत्री आणि उर्जा एवं संरचना विभागाचे दीप वर्मा यांनी आपल्या मार्गदर्शनातून विद्यार्थी व उपस्थित नागरिकांना पर्यावरणाचे महत्व पटवून दिले. प्रास्ताविक क्षेत्रीय प्रचार अधिकारी हंसराज राऊत यांनी केले. संचालन प्रमुख वैज्ञानिक अधिकारी अपराजिता वर्धन यांनी केले, तर आभार स्वानंद कळंबे यांनी मानले.

Post Views: 434
Previous Post

चक्क समोस्यामध्ये निघाली अळी…!!

Next Post

विदर्भ तेली समाज महासंघाची संवाद यात्रा उद्या वर्ध्यात..!

Next Post

विदर्भ तेली समाज महासंघाची संवाद यात्रा उद्या वर्ध्यात..!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Facebook Page

ताज्या बातम्या

संत सावता महाराज संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त चोपड्यात भक्तीमय सप्ताहाचे आयोजन

संत सावता महाराज संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त चोपड्यात भक्तीमय सप्ताहाचे आयोजन

by टीम लोकप्रवाह
August 3, 2026
0

चोपडा : श्री संत शिरोमणी सावता महाराज यांच्या संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त श्री फुलमाळी समाज सुधारणा समस्त पंचमंडळ व सर्व समाज...

डायल ११२ वर आत्महत्येचा खोटा कॉल; पोलिसांची दिशाभूल करणाऱ्या तरुणावर गुन्हा

डायल ११२ वर आत्महत्येचा खोटा कॉल; पोलिसांची दिशाभूल करणाऱ्या तरुणावर गुन्हा

by टीम लोकप्रवाह
August 3, 2026
0

चोपडा : आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांच्या मदतीसाठी असलेल्या डायल ११२ या हेल्पलाइनवर आत्महत्येबाबत खोटी माहिती देऊन पोलिसांची दिशाभूल केल्याचा प्रकार चोपडा...

वडती येथे पित्याकडून दोन मुलांवर जीवघेणा हल्ला; मुलीचा मृत्यू

वडती येथे पित्याकडून दोन मुलांवर जीवघेणा हल्ला; मुलीचा मृत्यू

by टीम लोकप्रवाह
August 2, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा, दि. २  : अडावद पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वडती (ता. चोपडा) येथे रविवारी पहाटे घडलेल्या हृदयद्रावक घटनेने संपूर्ण...

‘लोकप्रवाह न्यूज’च्या बातमीची वन विभागाकडून दखल; स्वामीनारायण मंदिर परिसरात पाहणी

‘लोकप्रवाह न्यूज’च्या बातमीची वन विभागाकडून दखल; स्वामीनारायण मंदिर परिसरात पाहणी

by टीम लोकप्रवाह
August 1, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि. 01 : शहरातील स्वामीनारायण मंदिर परिसरात तरस (तडस) दिसल्याने नागरिकांमध्ये निर्माण झालेल्या भीतीबाबत ‘लोकप्रवाह न्यूज’ने सविस्तर...

स्वामीनारायण मंदिर परिसरात तरसाची दहशत; वन विभागाने तातडीने कारवाई करावी, नागरिकांची मागणी

स्वामीनारायण मंदिर परिसरात तरसाची दहशत; वन विभागाने तातडीने कारवाई करावी, नागरिकांची मागणी

by टीम लोकप्रवाह
July 30, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि. 30 : शहरातील स्वामीनारायण मंदिर परिसरात गेल्या काही दिवसांपासून तरस हा जंगली प्राणी वारंवार दिसत असल्याची...

बजरंग नगर येथील श्री स्वामी समर्थ केंद्रात गुरुपौर्णिमा उत्सव भक्तिमय वातावरणात संपन्न

बजरंग नगर येथील श्री स्वामी समर्थ केंद्रात गुरुपौर्णिमा उत्सव भक्तिमय वातावरणात संपन्न

by टीम लोकप्रवाह
July 30, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि. 30 : शहरातील बजरंग नगर येथील श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रात गुरुपौर्णिमेनिमित्त सात दिवस चाललेल्या पारायण,...

  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!

WhatsApp us