चोपडा प्रतिनिधी : गुणवत्ता, सातत्य आणि अथक परिश्रम यांचा सुरेख संगम म्हणजे यंदाचा दहावीचा निकाल ठरला आहे. नुकत्याच ऑनलाईन जाहीर झालेल्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (SSC) परीक्षेच्या निकालात कु. स्वरा विनीत हरताळकर हिने तब्बल १०० टक्के गुण मिळवत विद्यालयाच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी नोंद होईल अशी अभूतपूर्व कामगिरी केली आहे.

स्वरा हिने केवळ विद्यालयात प्रथम क्रमांक मिळवला नसून, संपूर्ण चोपडा तालुक्यात अव्वल येण्याचा बहुमानही पटकावला आहे. विशेष म्हणजे, विवेकानंद विद्यालयाच्या इतिहासात प्रथमच एखाद्या विद्यार्थिनीने शंभर टक्के गुणांचा मानाचा टप्पा गाठल्याने संपूर्ण परिसरात आनंद आणि अभिमानाचे वातावरण निर्माण झाले आहे.

स्वराच्या या ऐतिहासिक यशाबद्दल तिच्या पालकांनी भावना व्यक्त करताना सांगितले की, “स्वराने जिद्द, शिस्त आणि सातत्यपूर्ण अभ्यासाच्या बळावर हे यश संपादन केले आहे. तिच्या या यशामुळे आमच्या कुटुंबासह विद्यालयाचाही गौरव वाढला आहे.”

गुणवत्तेची उज्वल परंपरा कायम
विद्यालयाचा एकूण निकाल ९९.२८ टक्के लागला असून, तब्बल २३ विद्यार्थ्यांनी ९० टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळवत गुणवत्तेची भक्कम परंपरा कायम राखली आहे.
विद्यालयातील गुणवंत विद्यार्थी पुढीलप्रमाणे :
- कु. सानवी अतुल पाटील — ९७.८०% (द्वितीय)
- चि. हर्षल भरत पाटील — ९७.६०% (तृतीय)
- कु. ऋतुजा किशोर पाटील — ९७.६०% (तृतीय)
- चि. सोहम हितेश जैन — ९७% (चतुर्थ)
विद्यालयाच्या या नेत्रदीपक यशाबद्दल संस्थेचे विद्यमान अध्यक्ष डॉ. विकास हरताळकर, माजी अध्यक्ष डॉ. विजय पोतदार, उपाध्यक्ष घनश्यामभाई अग्रवाल, सचिव ॲड. रवींद्र जैन, सहसचिव डॉ. विनीत हरताळकर तसेच सर्व विश्वस्तांनी विद्यार्थ्यांचे विशेष अभिनंदन केले.
तसेच विश्वस्त व मुख्याध्यापक नरेंद्र भावे, पवन लाठी, प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका आशा चित्ते, संजय सोनवणे, ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य पी. जी. पाटील, इंग्रजी माध्यमाच्या प्राचार्या भारती पंजाबी, गौरी शुक्ल, बालवाडी विभागाच्या मुख्याध्यापिका रेवती दीक्षित व योगिता केंगे यांनी सर्व यशस्वी विद्यार्थी, त्यांचे पालक आणि मार्गदर्शक शिक्षकांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
“विद्यार्थ्यांची अथक मेहनत, पालकांचे सातत्यपूर्ण सहकार्य आणि शिक्षकांचे प्रभावी मार्गदर्शन यामुळेच हे उज्ज्वल यश शक्य झाले,” असे गौरवोद्गार विद्यालयाच्या वतीने काढण्यात आले.
स्वरा हरताळकर हिची ही यशोगाथा आगामी काळात तालुक्यातील विद्यार्थ्यांसाठी निश्चितच प्रेरणादायी ठरणार आहे.








