टिम लोकप्रवाह, खारघर दि. ०२ – अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद पुणे अंतर्गत उत्तर महाराष्ट्र व नाशिक जिल्हा यांच्या वतीने परिषदेचे प्रदेश उपाध्यक्ष तथा ज्येष्ठ साहित्यिक देविदास फडताळे यांच्या ७४व्या वाढदिवसानिमित्त आयोजित काव्य स्पर्धेत खारघर, नवी मुंबई येथे राहणाऱ्या कवयित्री सौ. भारती दिलीप सावंत यांच्या कवितेला पाचवा क्रमांक प्राप्त झाला असून साहित्य वर्तुळातून त्यांच्यावर अभिनंदनचा वर्षाव होत आहे.

सौ. भारती सावंत यांची विविध विषयांवरची ६० पुस्तके प्रकाशित असून अनेक वृत्तपत्रं, साप्ताहिकं, मासिकं यात त्यांचे लिखाण नेहमी प्रकाशित होत असते. यंदाच्या शंभर दिवाळी अंकात त्यांचे साहित्य प्रकाशित झालेले आहे. त्यांना बालकविता संग्रहासाठी सरकारी अनुदान प्राप्त झाले आहे. त्यांच्या कथासंग्रह आणि कवितासंग्रह यांना या अगोदरही अनेक पुरस्कार प्राप्त झालेले आहेत.









