महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा इयत्ता बारावीचा निकाल आज रोजी जाहीर झाला आहे. निकालामध्ये यंदाही कोकण विभागाने बाजी मारली आहे.
यंदा राज्याचा निकाल 94.22 टक्के लागला आहे. तर कोकण विभागाचा निकाल 97.21 टक्के लागला आहे. सर्व विद्यार्थ्यांना त्यांचे मार्क्स आॕनलाईन बघता येणार आहेत.
विभागनिहाय निकाल :- कोकण विभाग – 97.21 टक्के, पुणे विभाग – 93.61 टक्के, कोल्हापूर विभाग – 95.07 टक्के, अमरावती विभाग – 96.34 टक्के, नागपूर विभाग – 96.52 टक्के, लातूर विभाग – 95.25 टक्के, मुंबई विभाग – 90.91 टक्के, नाशिक विभाग – 95.03 टक्के, औरंगाबाद विभाग – 94.97 टक्के याप्रमाणे आहे.
या परीक्षेला राज्यातील नऊ विभागीय मंडळामधील सर्व शाखांमधून 35527 पुनर्परीक्षार्थी विद्यार्थ्यांनी तयारी केली होती. त्यापैकी 35368 विद्यार्थी परीक्षेस पात्र झाले होते. त्यापैकी 18755 विद्यार्थी उत्तीर्ण झालेत. आणि त्यांची निकालाची एकुण टक्केवारी 53.02 इतकी आहे.








