लोकप्रवाह, चोपडा दि. ३० जुलै – येथील गोवर्धन गोशाळेत अरण्या फार्मस, विरवाडे व विठ्ठल-अँफ्रो-बीसीआय संस्थेच्या संयुक्त विद्यमाने “अन्न हेच औषध” या विषयावर आयोजित व्याख्यानामध्ये मुंबईच्या ग्लोबल हॉस्पिटलचे डॉ. प्रशांत राजपूत यांनी आपले आरोग्य व्यवस्थित राखायचे असेल तर जमिनीचे आरोग्य सुधारले पाहिजे. असे मत मांडले. यावेळी विधान सभेचे माजी अध्यक्ष अरूणभाई गुजराथी, वसंतलाल गुजराथी व प्रदीप गुजराथी यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
उपस्थितांसमोर मनोगत व्यक्त करतांना डॉ प्रशांत राजपूत..
गेल्या काही दशकात खते, किडनाशके आणि तणनाशकांच्या अतिवापराने जमिनीचे आरोग्य बिघडले आहे. त्यामुळे आपले आरोग्य व्यवस्थित राखायचे असेल तर जमिनीचे आरोग्य सुधारले पाहिजे, असे मत डॉ. प्रशांत राजपूत यांनी व्यक्त केले. आज दिसणाऱ्या अनेक व्याधींचे मूळ अन्न आणि पाण्यात असून रासायनिक वापर वाढल्यानंतर ते दिसून आल्याचे डॉ.राजपूत यांनी यावेळी सांगितले.
विठ्ठल ऍफ्रो बीसीआय चे प्रमुख प्रदीप गुजराथी यांनी प्रास्ताविकात डॉ. राजपूत यांच्या शेती प्रयोगांची माहिती दिली. उपस्थितांचे आभार नोडल अधिकारी संजय देशमुख यांनी मानले. व्याख्यांनाला विविध क्षेत्रातील तज्ञ व मान्यवर तसेच रावेर तालुक्यातील केळी उत्पादनातील प्रगतिशील शेतकरी उपस्थित होते.
टिम लोकप्रवाह, चोपडा दि. 11| चोपडा नगरपरिषदेमार्फत शहरातील नागरिकांना आर्थिक दिलासा देण्यासाठी निवासी मालमत्तांसाठी विशेष ‘अभय योजना’ जाहीर करण्यात आली आहे....