टिम लोकप्रवाह, चोपडा दिनांक २३ :- महाराष्ट्र राज्य ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस म्हणजेच आयटकने कोल्हापूर शाहू भूमी ते दीक्षा भूमी, नागपूर अशी जनजागरण यात्रा २० नोव्हेंबर पासून सुरू केली आहे. ती यात्रा २८ ऑक्टोबर रोजी चोपडा तालुक्यात येत आहे. यात्रेत आयटक अध्यक्ष कॉ. सी. एन. देशमुख, सचिव शाम काळे, आशा नेते कॉ. प्रा. राजू देसले, अंगणवाडी अध्यक्ष माधुरी क्षीरसागर, किसान सभा अध्यक्ष कॉ. ॲड. हिरालाल परदेशी आदीसह तब्बल २० नेते सहभागी राहणार आहेत.

याप्रसंगी तालुक्यातील अंगणवाडी, ग्रामपंचायत, आशा स्वयंसेविका, सेवानिवृत्त कामगार व शेतमजूर आदींची छत्रपती शिवाजी महाराज चौकात सकाळी अकरा वाजता सभा आयोजित करण्यात आली आहे. या दृष्टीने नियोजन करण्यासाठी चोपडा शहरातील आयटक संपर्क कार्यालयात कॉ. अशोक गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली. यावेळी आयटकचे राज्य उपाध्यक्ष कॉ. अमृत महाजन यांनी मार्गदर्शन केले. या बैठकीला सर्वश्री काँ. भास्कर सुखराम सपकाळे व प्रकाश सपकाळे तुरखेडा तसेच ग्रामपंचायत कर्मचारी महासंघाचे जिल्हा उपाध्यक्ष किशोर कंडारे यावल, शेतमजूर युनियनचे जिल्हा सचिव कॉ वासुदेव कोळी, ग्रामपंचायत कर्मचारी महासंघाचे राज्य समिती सदस्य कॉ. महेंद्र धनगर, एसटी सेवानिवृत्त कामगार संघटनेचे कैलास पाटील, अंगणवाडी बालवाडी कर्मचारी युनियनच्या तालुकाध्यक्ष कॉ. वत्सला पाटील, ममता महाजन, शांताराम पाटील आदी उपस्थित होते.
त्यावेळी यात्रेचे २००० हस्तपत्रके वितरण करण्यात आले आहे. आशा स्वयंसेविकांना जी पगारवाढ जाहीर झाली. त्यांचा तालूकाव्यापी आनंदी मेळावा, अंगणवाडीच्या ४ डिसेंबर संप, ग्रामपंचायत कर्मचारी यांचा २८ नोव्हेंबर रोजीचा इशारा संप, शेतकरी, शेतमजूर व आदिवासींचे जमीन नावे करणे, दावे निकाली काढणे, शेतकऱ्यांचे शेतमालाचे भाव, सेवानिवृत्त कर्मचारी व शेतकरी शेतमजूर यांना किमान ५००० रुपये पेन्शन या प्रश्नी १८ डिसेंबर रोजी नागपूर येथील विधानसभेवर विराट मोर्चा धडकणार आहे. “देशातील कामगार विरोधी धोरणे, भांडवलदार कॉर्पोरेट घराणे त्यातही अडाणी अंबानी याना झुकते माफ देणारे, जाती धर्माचे नावे श्रमिक जनतेत फूट पाडणारे भाजप सरकार २०२४ को चले जाव ” हा मुख्य नारा ज्या इंडिया आघाडीने दिला त्यातील भारतीय कम्युनिस्ट पक्ष, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, काँग्रेस, राष्ट्रवादी (शरद पवार), शिवसेना (उबाठा) आदी पक्षांचे नेत्यांनी मार्गदर्शन करावे म्हणून त्या पक्षांचे जिल्हा नेत्यांना आमंत्रित करण्यात आले आहे, असे जनजागरण यात्रा तयारी आयोजन समितीने जाहीर केले आहे.