Monday, August 3, 2026
Lokprawah
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Lokprawah
No Result
View All Result

शेतकऱ्यांना संकटातून सावरण्यासाठी आर्थिक मदत द्या – रणजित कांबळे

जिल्हाधिकाऱ्यांना पत्र देत दिले निर्देश

टीम लोकप्रवाह by टीम लोकप्रवाह
February 12, 2024
in वर्धा जिल्हा, शेती विषयक
0
शेतकऱ्यांना संकटातून सावरण्यासाठी आर्थिक मदत द्या – रणजित कांबळे
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

टिम लोकप्रवाह, वर्धा दि. १२ (सचिन ओली) – जिल्ह्यातील देवळी तालुक्यात शनिवारी सायंकाळी झालेल्या अवकाळी पावसासह गारपिटीने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. हरभरा, गहू, तूर, कापूस यासह भाजीपाला पिके जमिनदोस्त झाली. नुकसानीबाबत शेतकरी पीकविमा कंपनीच्या ऑनलाईन संकेतस्थळावर व टोल फ्री नंबरवर 72 तासांच्या आत तक्रार करावयाची आहे. मात्र यात तांत्रिक अडचण येत असल्याचे समोर आले आहे. याबाबत आमदार रणजित कांबळे यांनी पत्र लिहित जिल्हाधिकारी यांना निर्देश देताच जिल्हाधिकारी राहुल कर्डीले यांनी पीकविमा बाबत ऑनलाईन पद्धतीत अडचण येत असल्यास शेतकऱ्यांनी तालुक्याच्या पीक विमा कार्यालयात अथवा प्रतिनिधीना वैयक्तिक अर्ज देण्याचे आदेश दिले. आमदारांच्या पुढाकाराने शेतकऱ्यांना होत असलेली अडचण तातडीने दूर झाली. सोबतच ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा काढला नाही, त्या शेतकऱ्यांचे देखील नुकसानीचे पंचनामे करून सरकारकडे मदतीचा प्रस्ताव तत्काळ पाठवून शेतकऱ्यांना संकटातून सावरण्यासाठी आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावे, अशी मागणी सुद्धा आमदार रणजित कांबळे यांनी केली.

पीक विमा धारक शेतकऱ्यांना नुकसानीच्या ७२ तासांच्या आत तक्रार करणे बंधनकारक असते. मात्र, पीक विम्यासंदर्भात तक्रार करावयाच्या ऑनलाइन पद्धतीत अनेक शेतकऱ्यांच्या तक्रारीच होत नसल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे महसूल विभाग, कृषी विभाग, तसेच पीक विमा कंपनीच्या प्रतिनिधींना शेतकऱ्यांच्या तक्रारी नोंदविण्याच्या संदर्भात येणारी तांत्रिक अडचण दूर करण्याबाबत सूचना कराव्या, ज्या गावात शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे, तेथील अधिकाऱ्यांमार्फत शेतकऱ्यांची तक्रार नोंदवून घ्यावी.

खरीप हंगामात सुद्धा अनेक पीक विमाधारक शेतकऱ्यांना मदत मिळाली नसल्याची तक्रार माझ्याकडे प्राप्त झाली आहे. यामुळे रब्बी हंगामात शेतकऱ्यांना अडचणींना समोर जावे लागणार नाही, अशी व्यवस्था यंत्रणेमार्फत उभारून शेतकऱ्यांच्या नुकसानीची दखल घेण्यात यावी. सोबतच ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा काढला नाही, त्या शेतकऱ्यांचे सुद्धा पंचनामे करून सरकारकडे मदतीचा प्रस्ताव तातडीने पाठवून त्यांना या संकटातून सावरण्यासाठी मदत करावी, अशी मागणी आमदार रणजित कांबळे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना पाठविलेल्या निवेदनातून केली. या निवेदनावर जिल्हा प्रशासनाने तातडीने पाऊल उचलल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

Post Views: 256
Previous Post

चोपडा टॅलेंट हंट परीक्षेला विद्यार्थ्यांचा उत्स्फुर्त प्रतिसाद

Next Post

करिअर निवडतांना प्लॅन बी तयार असू द्यावा – डाॅ. अमित हरताळकर

Next Post
करिअर निवडतांना प्लॅन बी तयार असू द्यावा – डाॅ. अमित हरताळकर

करिअर निवडतांना प्लॅन बी तयार असू द्यावा - डाॅ. अमित हरताळकर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Facebook Page

ताज्या बातम्या

वडती येथे पित्याकडून दोन मुलांवर जीवघेणा हल्ला; मुलीचा मृत्यू

वडती येथे पित्याकडून दोन मुलांवर जीवघेणा हल्ला; मुलीचा मृत्यू

by टीम लोकप्रवाह
August 2, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा, दि. २  : अडावद पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वडती (ता. चोपडा) येथे रविवारी पहाटे घडलेल्या हृदयद्रावक घटनेने संपूर्ण...

‘लोकप्रवाह न्यूज’च्या बातमीची वन विभागाकडून दखल; स्वामीनारायण मंदिर परिसरात पाहणी

‘लोकप्रवाह न्यूज’च्या बातमीची वन विभागाकडून दखल; स्वामीनारायण मंदिर परिसरात पाहणी

by टीम लोकप्रवाह
August 1, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि. 01 : शहरातील स्वामीनारायण मंदिर परिसरात तरस (तडस) दिसल्याने नागरिकांमध्ये निर्माण झालेल्या भीतीबाबत ‘लोकप्रवाह न्यूज’ने सविस्तर...

स्वामीनारायण मंदिर परिसरात तरसाची दहशत; वन विभागाने तातडीने कारवाई करावी, नागरिकांची मागणी

स्वामीनारायण मंदिर परिसरात तरसाची दहशत; वन विभागाने तातडीने कारवाई करावी, नागरिकांची मागणी

by टीम लोकप्रवाह
July 30, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि. 30 : शहरातील स्वामीनारायण मंदिर परिसरात गेल्या काही दिवसांपासून तरस हा जंगली प्राणी वारंवार दिसत असल्याची...

बजरंग नगर येथील श्री स्वामी समर्थ केंद्रात गुरुपौर्णिमा उत्सव भक्तिमय वातावरणात संपन्न

बजरंग नगर येथील श्री स्वामी समर्थ केंद्रात गुरुपौर्णिमा उत्सव भक्तिमय वातावरणात संपन्न

by टीम लोकप्रवाह
July 30, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि. 30 : शहरातील बजरंग नगर येथील श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रात गुरुपौर्णिमेनिमित्त सात दिवस चाललेल्या पारायण,...

दादासाहेब डॉ. सुरेश जी. पाटील महाविद्यालयात भटक्या जनावरांबाबत जनजागृती उपक्रम

दादासाहेब डॉ. सुरेश जी. पाटील महाविद्यालयात भटक्या जनावरांबाबत जनजागृती उपक्रम

by टीम लोकप्रवाह
July 17, 2026
0

टिम लोकप्रवाह, दि. १७ जुलै, चोपडा : महात्मा गांधी शिक्षण मंडळ संचलित दादासाहेब डॉ. सुरेश जी. पाटील महाविद्यालयात भटक्या जनावरांमुळे...

डोंबिवलीतील महिला डॉक्टरवरील हल्ल्याच्या निषेधार्थ आयएमए चोपडातर्फे तहसीलदारांना निवेदन

डोंबिवलीतील महिला डॉक्टरवरील हल्ल्याच्या निषेधार्थ आयएमए चोपडातर्फे तहसीलदारांना निवेदन

by टीम लोकप्रवाह
July 17, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा, दि. १७ जुलै : डोंबिवली येथील शास्त्रीनगर महानगरपालिका रुग्णालयातील महिला डॉक्टर, परिचारिका व इतर आरोग्य कर्मचाऱ्यांवर स्थानिक...

  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!

WhatsApp us