Thursday, June 18, 2026
Lokprawah
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Lokprawah
No Result
View All Result

शेतकऱ्यांना संकटातून सावरण्यासाठी आर्थिक मदत द्या – रणजित कांबळे

जिल्हाधिकाऱ्यांना पत्र देत दिले निर्देश

टीम लोकप्रवाह by टीम लोकप्रवाह
February 12, 2024
in वर्धा जिल्हा, शेती विषयक
0
शेतकऱ्यांना संकटातून सावरण्यासाठी आर्थिक मदत द्या – रणजित कांबळे
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

टिम लोकप्रवाह, वर्धा दि. १२ (सचिन ओली) – जिल्ह्यातील देवळी तालुक्यात शनिवारी सायंकाळी झालेल्या अवकाळी पावसासह गारपिटीने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. हरभरा, गहू, तूर, कापूस यासह भाजीपाला पिके जमिनदोस्त झाली. नुकसानीबाबत शेतकरी पीकविमा कंपनीच्या ऑनलाईन संकेतस्थळावर व टोल फ्री नंबरवर 72 तासांच्या आत तक्रार करावयाची आहे. मात्र यात तांत्रिक अडचण येत असल्याचे समोर आले आहे. याबाबत आमदार रणजित कांबळे यांनी पत्र लिहित जिल्हाधिकारी यांना निर्देश देताच जिल्हाधिकारी राहुल कर्डीले यांनी पीकविमा बाबत ऑनलाईन पद्धतीत अडचण येत असल्यास शेतकऱ्यांनी तालुक्याच्या पीक विमा कार्यालयात अथवा प्रतिनिधीना वैयक्तिक अर्ज देण्याचे आदेश दिले. आमदारांच्या पुढाकाराने शेतकऱ्यांना होत असलेली अडचण तातडीने दूर झाली. सोबतच ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा काढला नाही, त्या शेतकऱ्यांचे देखील नुकसानीचे पंचनामे करून सरकारकडे मदतीचा प्रस्ताव तत्काळ पाठवून शेतकऱ्यांना संकटातून सावरण्यासाठी आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावे, अशी मागणी सुद्धा आमदार रणजित कांबळे यांनी केली.

पीक विमा धारक शेतकऱ्यांना नुकसानीच्या ७२ तासांच्या आत तक्रार करणे बंधनकारक असते. मात्र, पीक विम्यासंदर्भात तक्रार करावयाच्या ऑनलाइन पद्धतीत अनेक शेतकऱ्यांच्या तक्रारीच होत नसल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे महसूल विभाग, कृषी विभाग, तसेच पीक विमा कंपनीच्या प्रतिनिधींना शेतकऱ्यांच्या तक्रारी नोंदविण्याच्या संदर्भात येणारी तांत्रिक अडचण दूर करण्याबाबत सूचना कराव्या, ज्या गावात शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे, तेथील अधिकाऱ्यांमार्फत शेतकऱ्यांची तक्रार नोंदवून घ्यावी.

खरीप हंगामात सुद्धा अनेक पीक विमाधारक शेतकऱ्यांना मदत मिळाली नसल्याची तक्रार माझ्याकडे प्राप्त झाली आहे. यामुळे रब्बी हंगामात शेतकऱ्यांना अडचणींना समोर जावे लागणार नाही, अशी व्यवस्था यंत्रणेमार्फत उभारून शेतकऱ्यांच्या नुकसानीची दखल घेण्यात यावी. सोबतच ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा काढला नाही, त्या शेतकऱ्यांचे सुद्धा पंचनामे करून सरकारकडे मदतीचा प्रस्ताव तातडीने पाठवून त्यांना या संकटातून सावरण्यासाठी मदत करावी, अशी मागणी आमदार रणजित कांबळे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना पाठविलेल्या निवेदनातून केली. या निवेदनावर जिल्हा प्रशासनाने तातडीने पाऊल उचलल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

Post Views: 247
Previous Post

चोपडा टॅलेंट हंट परीक्षेला विद्यार्थ्यांचा उत्स्फुर्त प्रतिसाद

Next Post

करिअर निवडतांना प्लॅन बी तयार असू द्यावा – डाॅ. अमित हरताळकर

Next Post
करिअर निवडतांना प्लॅन बी तयार असू द्यावा – डाॅ. अमित हरताळकर

करिअर निवडतांना प्लॅन बी तयार असू द्यावा - डाॅ. अमित हरताळकर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Facebook Page

ताज्या बातम्या

जळगावात एसीबीची मोठी कारवाई; उपनिबंधक अधिकाऱ्याकडून १ कोटी ७७ लाखांचा मुद्देमाल जप्त

जळगावात एसीबीची मोठी कारवाई; उपनिबंधक अधिकाऱ्याकडून १ कोटी ७७ लाखांचा मुद्देमाल जप्त

by टीम लोकप्रवाह
May 22, 2026
0

टिम लोकप्रवाह, जळगाव, दि. २२ : लाचलुचपत प्रतिबंधक विभाग यांच्या जळगाव पथकाने मोठी कारवाई करत जामनेर येथील उपनिबंधक सहकारी संस्था...

चोपडा शहरातील शासकीय जमिनीवरील अतिक्रमणे नियमानुकूल करण्याची प्रक्रिया तात्काळ सुरू करावी : उपविभागीय अधिकारी मयुर भंगाळे यांचे प्रशासनाला निर्देश

चोपडा शहरातील शासकीय जमिनीवरील अतिक्रमणे नियमानुकूल करण्याची प्रक्रिया तात्काळ सुरू करावी : उपविभागीय अधिकारी मयुर भंगाळे यांचे प्रशासनाला निर्देश

by टीम लोकप्रवाह
May 20, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा : महाराष्ट्र शासनाच्या दि. 25 मार्च 2026 रोजीच्या महत्वपूर्ण शासन निर्णयाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी चोपडा शहरातील शासकीय जमिनीवरील...

सार्वजनिक बांधकाम विभागातील शाखा अभियंत्यास ५ लाखांची लाच घेताना रंगेहाथ पकडले

सार्वजनिक बांधकाम विभागातील शाखा अभियंत्यास ५ लाखांची लाच घेताना रंगेहाथ पकडले

by टीम लोकप्रवाह
May 9, 2026
0

जळगाव | प्रतिनिधी : सार्वजनिक बांधकाम विभाग, जळगाव येथील शाखा अभियंता वर्ग-२ योगेश अभिमन्यू अहिरे (वय ४४) यांना ५ लाख...

विवेकानंद विद्यालयाच्या ‘स्वरा’चा ऐतिहासिक शतकी झंकार १०० टक्के गुणांसह चोपडा तालुक्यात प्रथम; विद्यालयाचा निकाल ९९.२८ टक्के

विवेकानंद विद्यालयाच्या ‘स्वरा’चा ऐतिहासिक शतकी झंकार १०० टक्के गुणांसह चोपडा तालुक्यात प्रथम; विद्यालयाचा निकाल ९९.२८ टक्के

by टीम लोकप्रवाह
May 8, 2026
0

चोपडा प्रतिनिधी : गुणवत्ता, सातत्य आणि अथक परिश्रम यांचा सुरेख संगम म्हणजे यंदाचा दहावीचा निकाल ठरला आहे. नुकत्याच ऑनलाईन जाहीर...

सी. बी. निकुंभ हायस्कुलमधून प्रणाली सोनार प्रथम; शाळेचा निकाल ८०.५५ टक्के

सी. बी. निकुंभ हायस्कुलमधून प्रणाली सोनार प्रथम; शाळेचा निकाल ८०.५५ टक्के

by टीम लोकप्रवाह
May 8, 2026
0

चोपडा प्रतिनिधी : तालुक्यातील घोडगाव येथील सी. बी. निकुंभ माध्यमिक व उच्च माध्यमिक हायस्कूल संचलित नूतन शिक्षण प्रसारक मंडळाच्या शाळेचा...

बालमोहन विद्यालयाच्या संकेत जोशीचे बारावी परीक्षेत घवघवीत यश

बालमोहन विद्यालयाच्या संकेत जोशीचे बारावी परीक्षेत घवघवीत यश

by टीम लोकप्रवाह
May 8, 2026
0

चोपडा प्रतिनिधी : नुकत्याच जाहीर झालेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इयत्ता १२ वी) परीक्षेच्या निकालात बालमोहन विद्यालय येथील विद्यार्थी संकेत अजय...

  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!

WhatsApp us