टिम लोकप्रवाह, चोपडा दि. ११ – तालुका व शहर भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (आय) पक्षाच्या वतीने जळगाव जिल्हा काँग्रेस कमिटीचे माजी जिल्हाध्यक्ष ॲड.संदीप सुरेश पाटील यांच्या नेतृत्वात गटविकास अधिकारी यांना तालुक्यातील आदिवासी भागातील राहणाऱ्या नागरिकांना निर्माण होणाऱ्या मूलभूत समस्या, पिण्याच्या पाण्याची समस्या, विद्युत समस्या व घरकुलाच्या समस्या इत्यादी बाबतीत निर्माण होणाऱ्या अडीअडचणींवर त्वरित कायमस्वरूपी उपाययोजना करण्यासाठी निवेदन देण्यात आले. तसेच या समस्यांबाबत नागरिकांमध्ये प्रचंड आक्रोश व नाराजी शासनाबद्दल असल्याचे ॲड. संदीप पाटील यांनी यावेळी सांगितले. गटविकास अधिकारी यांनी सदरील कामांबाबत तात्काळ कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले.










