टिम लोकप्रवाह, वर्धा दि. १५ हिंगणघाट – आंम्ही सावित्रीमाईच्या लेकी, आम्हास नाही आता कुणाची भिती हा शिक्षणाचे माध्यमातून झालेला बदल महिलांना आपले अधिकार, कर्तव्य व कार्यतत्परता जाणीव करुन देण्याचे कार्य महिला सक्षमीकरणाचा भाग ठरत असतो. तेव्हां अशा आयोजनाने महिलांमध्ये जनजागृती होऊन स्री चे हक्क व अधिकार यातून सामाजिक उत्थान साधता येते, असे विचार जोत्सना जांभुळकर यांनी महिला मेळाव्याप्रसंगी व्यक्त केले.

जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने वृंदावनी महिला बहुउद्देश्यीय संस्था व राजाराम सार्वजनिक वाचनालय, पिंपळगांव (मा.) यांचे संयुक्त विद्यमाने महिला मेळावा व रक्त तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जोत्सना जांभुलकर तर प्रमुख अतिथी गोडघाटे, अॕड. वीणा घ्यारे, डॉ. प्रेरणा पवार, संस्थेच्या अध्यक्षा वृंदा बाराहाते आदि व्यासपीठावर उपस्थित होत्या. कार्यक्रमाच्या सुरुवातीला आई सावित्रीमाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन, माल्यार्पण व दिप प्रज्वलन करण्यात आले. प्रस्ताविक वृंदा बाराहाते यांनी केले तर सुत्रसंचालन माया खंडागकार तर आभार प्रदर्शन मून यांनी केले. यावेळी महिलांच्या आरोग्य विषयक रक्त तपासणी शिबीर आयोजनात १४० महिलांनी आपले तपासणी करुन हा कार्यक्रम यशस्वी केला.








