टिम लोकप्रवाह, वर्धा दिनांक 22 ( सचिन ओली ) – डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला संलग्नित कृषि महाविद्यालय पिपरी (meghe), वर्धा येथील चौथ्या वर्षाच्या विद्यार्थ्यांनी ग्रामीण कृषी कार्यानुभव आणि औद्योगिक प्रशिक्षण अंतर्गत सिरसगांव (ध) येथील शेतकरी बांधवांना बीज उगवण क्षमतेबद्दल महत्वाचे मार्गदर्शन केले.

खरीप हंगामात पेरणी करते वेळी शेतकऱ्यांना सोयाबीन बियाण्याची उपलब्धता आणि बोगस बियाणे संकटाला सामोरे जावे लागते, अशावेळी अत्यंत दक्षतेने बियाण्याची उगवण क्षमता तपासणे व बियाणे हे प्रमाणित आहेत की नाहीं ही तपासणे हे महत्वाचे आहे. बियाणे बोगस असल्यास शेतकऱ्यांचे आर्थिक व हंगामी नुकसान होऊ शकते. त्यामुळे बियाण्याची उगवण क्षमता तपासल्यास पुढील शेती क्रियाकलापात देखील मदत होते. जर बियाणे बोगस पेरणी केल्यास शेतीचा हंगाम लांबू शकतो. बिज उगवण शक्ती तपासल्यास त्यापासून होणाऱ्या फायद्याबाबत उपस्थित शेतकरी व ग्रामस्थाना समजावून सांगण्यात आले.

सदर कार्यक्रम बजाज कृषी महाविद्यालय येथील प्राचार्य डॉ. बी. के. सोनटक्के, उपप्राचार्य डॉ. स्नेहल देशमुख, कार्यक्रम समन्वय डॉ. राजेंद्र खर्चे, कार्यक्रमाधिकारी डॉ. रविराज उदासी, डॉ. मंगेश घोडे, डॉ. प्रियका हिरोळे यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आला. यावेळी प्रात्यक्षिक गोपाल बिसने, केतन ठमके, आदित्य ठाकरे, अंशल शेंडे व निर्णय वैद्य या विद्यार्थ्यांमार्फत घेण्यात आले.








