टिम लोकप्रवाह, वर्धा (सचिन ओली) – वसुंधरेवरील पशु, पक्षी आणि मानवी जीवनावर वृक्षतोडीमुळे कमी होणारी झाडाची संख्या यामुळे भविष्यात दुष्परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही. वृक्ष लागवड आणि संवर्धन ही आधुनिक काळाची नितांत गरज असल्यामुळे त्यासाठी झाडे लावून ती जगली तरच वसुंधरा आणि सृष्टीतील प्राणीमात्र यांचा समतोल कायम राहील. या उदात्त हेतूने युवा संघर्ष सामाजिक संघटना, पिपरी मेघे यांच्या वतीने मोफत १७०० वृक्ष रोपटे लागवडीसाठी मान्यवरच्या हस्ते परिसरातील नागरीकांना वाटप करण्यात आले. सदर कार्यक्रम पिपरी मेघे येथे दिनांक ११ ऑगस्ट रोजी शिव पार्वती मंगल कार्यालयात सकाळी १० वाजता पार पडला. कार्यक्रमाची सुरवात मान्यवराच्या हस्ते दीपप्रज्वल व पाच वृक्ष रोपटांची पूजा करून झाली.

या समाजभिमुख कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून संघटनेचे अध्यक्ष उमेश खांडेकर तर प्रमुख पाहुणे म्हणून उपमुख्य कार्यकारी अधीकारी डॉ. ज्ञानदा फणसे, वैदकीय जनजागृती मंच अध्यक्ष डॉ. सचिन पावडे, सहासिक जनशक्ती संघटना अध्यक्ष रवि कोटंबकर, युवा सोशल फोरम अध्यक्ष सुधीर पांगुळ, माजी नगरध्यक्ष शेखर शेंडे, माजी जिल्हा परिषद सदस्य संजय शिंदे, माजी प. स. सदस्य डॉ. बाळा माऊसकर, उपसरपंच गजानन वानखेडे, माजी सरपंच तथा विद्यमान ग्रामपंचायत सदस्य सतीश ईखार, जेष्ठ समाजसेवक सुनील बुरांडे, सामाजिक कार्यकर्ता महादेव शेंडे, वैद्यकीय जनजागृती मंच सदस्य डॉ. यशवंत हिवंज, सेवा निवृत्त क्रीडाअधिकारी प्रशांत दोंदल, शिवानी राणा रणनवरे, अतुल पिसे, प्रवीण हाडे, मंडळ अधिकारी पिपरी मेघे आदी मान्यवरांची मंचावर उपस्थिती होती .

अतिशय नियोजनबद्ध कार्यक्रमाचे आयोजन युवा संघर्ष सामाजिक संघटना, पिपरी मेघेचे वतीने करण्यात आले होते. त्याप्रसंगी आयोजकांनी सर्व मान्यवरांना वृक्ष देऊन स्वागत केले. सामाजिक दायित्वाची भान असलेली युवा संघर्ष सामाजिक संघटना, पिपरी मेघे यांनी प्रत्येकांना एक वृक्ष वाटप केले. जे वृक्ष पर्यावरणासाठी गरजेचे आहे. आज वनऔषधी वृक्षतोड झाल्यामुळे ते लुप्त होत चालले आहे. परिणामी पशुपक्षानां खाद्य मिळेनासे झाले आहे. त्यामुळे त्यांच्या प्रजाती लुप्त होत असल्याचे दिसून येत आहे. भविष्यात पशुपक्षी यांना उंबर, जांभूळ, शेवंगा, चीचबिली, बेल, आवळा झाडांची गरज आहे. आदी झाडांचे त्यांनी वाटप केले. त्यामुळे पर्यावरण संतुलनाबरोबर पशु पक्षी यांचे सुद्धा रक्षण होईल. हा उद्देश ठेवून रोपांची निवड या कार्यक्रमाच्या माध्यमातून या संघटनेने केली आहे. समाजात अशाच सामाजिक कार्य करण्याची गरज असल्याचे मनोगत यावेळी प्रमुख मान्यवरांनी व्यक्त केले.

याचबरोबर सर्व मान्यवर व उपस्थितांना संचालनकर्त्यानी वृक्षवल्ली व सभोवतालच्या जल, मृद आणि वायू या घटकांना सांभाळणाऱ्या पर्यावरणाचा मान ठेवून त्यांचे संवर्धनासाठी दैनंदिन जीवनात संवेदनशीलतेने वागण्याची शपथ दिली हे कार्यक्रमाचे वैशिष्ट ठरले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक दीपक गुढेकर तर सुत्रसंचालन अविनाश जाधव आणि आभार मारोती उईके यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता गजानन भातकुलकर, सुधीर वसू, आनंद धामणकर, गजानन वानखेडे, महिंद्रा लोखंडे, मयूर उईके, रमेश आंबटकर, अरविंद सहारे, हरीश कनोजे, अंकुश धुर्वे, आदित्य दाते, अभिषेक ढुमने, मुकुंद अडसळ, राज ठाकरे, रमेश आंबटकर, हेमराज नेताम, भगवान गडकरी, प्रदीप श्रिरसागर, पद्माकर खेकडे, सुनील भागवतकर , गजानन कदम, अरविंद लोहे, दीपक पेढेकर, गजानन भोयर, अमन ढुमणे, विकी पिंपळे, प्रशिल चरडे, भूषण जगताप, रामदास डुकरे सर, राजदत्त रणवरे, मनोज जगताप, राजेंद्र सूर्यवंशी, भरत मुडे, गजानन पुरणकर, आदित्य लोहारे, सुरज कुदेवाल, राकेश टागोर, राज दांदडे, अविनाश मेश्राम, वैभव मडावी, अनिल पुरी, विक्की गावंडे, प्रज्वल देवडे, धनंजय इटाळे, विजय तळवेकर, प्रभाकर भुसे, पवन राऊत, मनोज इवनाथे, दिनेश वंजारी, गजानन महाजन आदींनी अथक परिश्रम घेतले.








