टिम लोकप्रवाह, वर्धा दि. 25 – नुकत्याच राज्याच्या विधानसभा निवडणूक आटोपून महायुती सरकार स्थापन होऊन व मुख्यमंत्री पदाचे सूत्र हाती घेतल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काही प्रशासकीय बदल्या केल्या. यामध्ये तब्बल 12 सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. त्यात वर्धा जिल्ह्याचे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांची नाशिक महानगर पालिकेचे आयुक्त म्हणून बदली करण्यात आली. तर त्यांच्या जागी नूतन जिल्हाधिकारी म्हणून श्रीमती वान्मथी सी यांची नियुक्ती झाली आहे.

श्रीमती वान्मथी सी या २०१५ बॅच च्या आयएएस अधिकारी आहेत सध्या त्या राज्य कर विभाग इथे सह आयुक्त म्हणून कार्यरत आहेत. श्रीमती वान्मथी सी या वर्धा जिल्ह्याच्या नूतन जिल्हाधिकारी म्हणून लवकरच रुजू होत आहे.








