लोकप्रवाह,चोपडा दि. १६ – येथील धरणगांव रस्त्यावरील मजरेहोळ फाट्याजवळ चोपडयाहुन धुळ्याकडे जाणाऱ्या मारुती ओमनी व मोटरसायकल यांच्यात समोरासमोर झालेल्या भीषण धडकेत मोटरसायकलवर प्रवास करणारे चोपड्यातील दोघे जागीच ठार झाले तर मारुती ओमनीतील सहा जण जखमी झाल्याची घटना दि. १५ नोव्हेंबर रोजी रात्री साडेनऊ वाजता घडली. यात जखमी असलेल्यांवर चोपडा उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत तर दोघांना धुळे व जळगांव येथे हलविण्यात आले आहे.
अपघातग्रस्त मोटरसायकल
याबाबत सविस्त वृत्त असे की, वाडीभोकर ता.जि. धुळे येथील सहा जण मारुती ओमनी क्रमांक MH 18 W 7987 मधून चोपड्याकडून धुळ्याकडे जात असतांना चोपडा – धरणगाव रस्त्यावरील मजरेहोळ फाट्याजवळ धरणगाव कडून चोपड्याकडे येणाऱ्या मोटरसायकल क्रमांक MH 19 CL 7241 यांच्यामध्ये समोरासमोर झालेल्या धडकेत चोपडा शहरातील अफसर इरफान काझी वय – 48 वर्षे रा. दर्गाह अळी, चोपडा व शेख अनिस शेख जहुर वय – 46 वर्षे रा. धरणगांव ह.मु. मणियार अळी, चोपडा यांना गंभीर दुखापत होवून त्यांचा जागीच मृत्यू झाला. तर मारुती ओमनीतील अविनाश बोरसे, आकाश साळवे, सागर पानपाटील, वाहन चालक अजय मोरे, राहुल घोडे, दीपक धनले सर्व रा. वाडीभोकर, धुळे हे जखमी झाले आहेत. अपघाताचे वृत्त कळताच चोसाकाचे व्हा चेअरमन शशिकांत देवरे,माजी नगरसेवक हुसेन पठाण,वेले येथील माजी उपसरपंच विनोद पाटील यांनी चोपडा उपजिल्हा रुग्णालयात धाव घेतली. तर डॉ. नरेंद्र पाटील व डॉ. सुरेश पाटील यांनी जखमींवर उपचार केले. या अपघातात जखमी झालेले वाहनचालक अजय मगन मोरे याच्या डोळ्याला जबर दुखापत झाल्यामुळे पुढील उपचारासाठी त्वरीत धुळे येथे हलविण्यात आले.
अपघातग्रस्त चारचाकी मारुती ओमनी
अपघात घडल्यानंतर घटनास्थळी व उपजिल्हा रुग्णालय येथे सहाय्यक पोलीस अधीक्षक कृषीकेश रावले व पोलीस निरिक्षक अवतारसिंग चव्हाण यांनी भेट घेत अपघाताची माहिती घेतली. तसेच सहा.पोलीस निरिक्षक अजित सावळे, पोलीस उपनिरिक्षक घनश्याम तांबे, पोना.संतोष पारधी, शेषराव तोरे, ज्ञानेश्वर जवागे, वेलचंद पवार, मधुकर पवार, सुमेरसिंग वाघेर आदिंसह इतर पोलीस कर्मचाऱ्यांनी व जखमींना मदत करणाऱ्या लोकांनी मृत व जख्मी यांची कागदपत्रे बघून ओळख पटवली. सदर अपघाताबाबत अक्समात मृत्यू म्हणून चोपडा शहर पोलीस स्टेशनला नोंद करण्यात आलेली असून अद्याप गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही.
टिम लोकप्रवाह, चोपडा दि. 11| चोपडा नगरपरिषदेमार्फत शहरातील नागरिकांना आर्थिक दिलासा देण्यासाठी निवासी मालमत्तांसाठी विशेष ‘अभय योजना’ जाहीर करण्यात आली आहे....